
नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) – राज्यशासनाने संच मान्यतेसाठी इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची माहिती सरल प्रणालीवर भरणे शाळांना बंधनकारक केले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत इयत्ता १२ वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना आधारकार्डशी लिंक करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात दिली.
सरल प्रणालीवर विद्यार्थ्यांची नावे येण्यासाठी प्रत्येक तालुक्यात २ यंत्रे देण्यात आली आहेत. केंद्रशासनाच्या आय्.टी.आय. संस्थेला याची ठेकेदारी देण्यात आली आहे. राज्यातील एकूण ५ लाख १३ सहस्र १६३ विद्यार्थ्यांता आधारकार्डशी लिंक करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांची नावे २ वेळा घेण्यात येतात. आधारकार्डशी लिंक केल्यामुळे विद्यार्थ्यांची २ वेळा नावे येणार नाहीत.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !