देशात कोरोना संपण्याच्या उंबरठ्यावर !

नवी देहली – एप्रिल २०२२ नंतर २ डिसेंबर या दिवशी प्रथमच देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अगदी नगण्य नोंदवली गेली आहे. देशात २ डिसेंबरला कोरोनाचे केवळ २७५ रुग्ण आढळून आले आहेत. यात छत्तीसगडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सध्या देशात ४ सहस्र ६७२ इतके सक्रीय रुग्ण आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत ५ लाख ३० सहस्र ६२४ लोकांची ‘अधिकृत मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली आहे.