
मुंबई – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने संसदीय दलाच्या बोलावलेल्या बैठकीत लोकसभेतील ९ पैकी अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे तिघे खासदारच उपस्थित राहिले, तर उर्वरित ६ खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
पक्षाने व्हीप (एखाद्या राजकीय पक्षाने त्याचे आमदार किंवा खासदार यांना दिलेले अधिकृत निर्देश) बजावूनही खासदार अनुपस्थित होते. संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील-आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील अशी त्यांची नावे आहेत. या अनुपस्थितीनंतर ठाकरे गटाने संबंधित खासदारांना तातडीने ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्याची प्रक्रिया चालू केली आहे. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न आल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याचा प्रस्ताव सादर केला असल्याचे समजते.
हार्बर रेल्वेत लावली आहेत ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारी पत्रके !
‘बेस्ट’च्या संपामुळे प्रवाशांचे हाल; दगडफेकीसह तोडफोडीच्या घटना !
खराडीतील भोंदू राधामोहन मिश्रासह ८ जण कह्यात !
‘स्मार्ट मीटर’ची बळजोरी केल्यास तीव्र आंदोलन करणार !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरसह महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर ६० दिवस ड्रोनबंदी !
‘नीट’ परीक्षेसाठी गोव्यात सर्व केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था