
बेळगाव – कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २० जून या दिवशी पाण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्र सरकारकडे २ ‘टी.एम्.सी.’ पाणी सोडण्याकरता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रस्ताव ठेवला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी महंमद रोशन यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ‘‘पावसाने अद्यापही समाधानकारक उपस्थिती न लावल्याने बेळगाव शहरासह परिसरात पाणीपुरवठा करणार्या धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोचला आहे. अनेक ठिकाणी मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा चालू असून संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र सरकारकडे २ ‘टी.एम्.सी.’ पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आगामी बैठकीत पाणी समस्येवर तोडगा निघण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.’’
गडचिरोलीमधील लोहखनिज खाणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडून मागणी
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !
येत्या १५ दिवसांत येणार ‘माझा फ्लॅट’ योजना ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
इचलकरंजीला (जिल्हा कोल्हापूर) शाश्वत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घोषित करण्यात येणार ! – मुख्यमंत्री
भीमाशंकर भाविकांसाठी प्रवेशिका (पास) घेण्याचा सक्तीचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला !
‘सव्यसाचि गुरुकुलम्’ चे प्रधान आचार्य लखन जाधवगुरुजी ‘गुरुवर्य’ पुरस्काराने सन्मानित !