पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !

सातारा, १८ जून (वार्ता.) – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी वीज वितरणच्या कर्मचार्‍यांकडून वीजवाहिन्या, खांब, विद्युत्जनित्र आदींच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडून होणारे अपघात अन् वीज खंडित होण्याच्या घटना टाळण्यासाठी कामे पूर्ण केली जात आहेत.

जीर्ण तारा बदलणे, सैल खांब मजबूत करणे, विद्युत्जनित्रांची दुरुस्ती करणे, वीजवाहिन्यांच्या मार्गातील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जात आहे. आपत्कालीन स्थितीला प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथकेही सिद्ध केली आहेत. तात्पुरता वीजपुरवठा बंद ठेवावा लागल्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.