
सातारा, १८ जून (वार्ता.) – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी वीज वितरणच्या कर्मचार्यांकडून वीजवाहिन्या, खांब, विद्युत्जनित्र आदींच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडून होणारे अपघात अन् वीज खंडित होण्याच्या घटना टाळण्यासाठी कामे पूर्ण केली जात आहेत.
जीर्ण तारा बदलणे, सैल खांब मजबूत करणे, विद्युत्जनित्रांची दुरुस्ती करणे, वीजवाहिन्यांच्या मार्गातील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जात आहे. आपत्कालीन स्थितीला प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथकेही सिद्ध केली आहेत. तात्पुरता वीजपुरवठा बंद ठेवावा लागल्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या मुख्यमंत्र्यांची २० जूनला पाण्यासाठी महत्त्वाची बैठक
गडचिरोलीमधील लोहखनिज खाणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडून मागणी
येत्या १५ दिवसांत येणार ‘माझा फ्लॅट’ योजना ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
इचलकरंजीला (जिल्हा कोल्हापूर) शाश्वत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घोषित करण्यात येणार ! – मुख्यमंत्री