
जत (जिल्हा सांगली), १४ सप्टेंबर (वार्ता.) – लवंगा येथील घटनेचे कसून अन्वेषण व्हावे आणि दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी. २ वर्षांपूर्वी पालघर येथे अशाच पद्धतीने जमावाकडून हिंदु साधू-संतांना झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. अशा पद्धतीने समाजविघातक घटनेची पुनरावृत्ती होत असल्याने ‘साधू-संतांचा देश असलेल्या भारतात जाणीवपूर्वक साधू-संतांना लक्ष्य केले जात आहे का ?’, याचे अन्वेषण करावे, अशा मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने जत पोलीस ठाणे, तसेच प्रांत कार्यालयात देण्यात आले. याप्रसंगी बजरंग दलाचे सर्वश्री रागवेंद्र आवलकी, राहुल गुरव, सुनील चव्हाण, गौडाप्पा मदभावी, इरप्पा मुढशी, ओंकार घेज्जी, भैरू धोडमल, विकास बागडे, सुनील शिवपुजी, कलमेश हिप्पर्गी, गुरु कोळी, मुर्गेश ब्याडगी, श्रीधर मुरगुंडी, बसू कर्पे उपस्थित होते.
Pakistan Sikh Murder : पाकिस्तानातील गुरुद्वारामध्ये घुसून शीख सेवादार दांपत्याची हत्या
भाजपची विचारसरणी सोडून अन्य पक्षात गेलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश नाही ! – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
सांगली येथे महापालिकेच्या स्वच्छता अधिकार्याला महिलेकडून मारहाण !
दोषींवर कठोर कारवाई करून ‘मकोका’ लावणार ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री
आज सोलापूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीचे मतदान !
थोडक्यात महत्त्वाचे : (१८.०६.२०२६)