सर्व साधकांना मोक्षाचा मार्ग दाखवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘देव भाव आणि भक्ती भरभरून देतो; परंतु ती टिकवून ठेवण्यासाठी काय करायला हवे; हे मात्र केवळ श्री गुरुच सांगतात. साधनेत भाव आणि भक्ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन होणे अत्यंत आवश्यक आहे. हेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ओळखून त्यांनी सनातनच्या साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन ही प्रक्रिया शिकवली आहे. परात्पर गुरु डॉक्टर साधकांना ही प्रक्रिया शिकवून केवळ थांबले नाहीत, तर ‘साधक प्रक्रिया नियमितपणे राबवत आहेत ना ?’, हे पहाण्यासाठी त्यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्याची पद्धत निर्माण केली. केवळ सनातनच्या साधकांसाठीच नव्हे, तर अखिल मानवजातीसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन पद्धत’ निर्माण केली आहे. मानवजातीला दिलेली त्यांनी ही एक अनमोल देणगीच आहे. त्यामुळेच म्हणावेसे वाटते ‘अमोल चीज जो दी गुरुने, न दे सके भगवान भी ।।’
– श्री. रोहित साळुंके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१२.२०२१)
पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारून विनाशाच्या दिशेने जात असलेला समाज !
गुरुपौर्णिमेला ४९ दिवस शिल्लक
आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ !
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिका सौ. लता ढवळीकर यांनी अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर केलेल्या उपायांमागील शास्त्र
साधकसंख्या अल्प असतांनाही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अखंड कार्यरत असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !