सर्व साधकांना मोक्षाचा मार्ग दाखवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘देव भाव आणि भक्ती भरभरून देतो; परंतु ती टिकवून ठेवण्यासाठी काय करायला हवे; हे मात्र केवळ श्री गुरुच सांगतात. साधनेत भाव आणि भक्ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन होणे अत्यंत आवश्यक आहे. हेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ओळखून त्यांनी सनातनच्या साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन ही प्रक्रिया शिकवली आहे. परात्पर गुरु डॉक्टर साधकांना ही प्रक्रिया शिकवून केवळ थांबले नाहीत, तर ‘साधक प्रक्रिया नियमितपणे राबवत आहेत ना ?’, हे पहाण्यासाठी त्यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्याची पद्धत निर्माण केली. केवळ सनातनच्या साधकांसाठीच नव्हे, तर अखिल मानवजातीसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन पद्धत’ निर्माण केली आहे. मानवजातीला दिलेली त्यांनी ही एक अनमोल देणगीच आहे. त्यामुळेच म्हणावेसे वाटते ‘अमोल चीज जो दी गुरुने, न दे सके भगवान भी ।।’
– श्री. रोहित साळुंके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१२.२०२१)
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
वारकरी संप्रदायात संतसंगतीचे महत्त्व
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
गुरुस्तवन भावांजली : वैराग्यस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !