
मुंबई, २३ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यात धर्मांतर बंदी कायद्याची आवश्यकता आहे. सरकार याविषयी टाळाटाळ करत आहे. धर्मांतरामुळे हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. याविषयी निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने महाराष्ट्रात धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार राज्यात तात्काळ धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी विधानसभेचे शिवसेनेचे पक्ष प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

भरतशेठ गोगावले यांनी पत्रासमवेत हिंदु जनजागृती समितीने दिलेले निवेदनही जोडले आहे. पत्रात म्हटले आहे की, धर्मांतर बंदी कायद्यासंदर्भात सरकारकडे काही महत्त्वाच्या व्यक्ती, आमदार, सामाजिक संघटना यांनीही पत्रव्यवहार केला आहे; मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. याचा परिणाम राज्यात धर्मांतराच्या घटना सतत वाढत आहेत. प्रलोभने, फसवणूक आणि बळजोरी करणे यांद्वारे गरीब हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. त्यामुळे हिंदु समाजामध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. धर्मांतर रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेळ न दवडता राज्यात तात्काळ धर्मांतर बंदी कायदा लागू करावा.
राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पद्धतीचा अभ्यास करणार ! – वनमंत्री गणेश नाईक
विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वाचे ! – डॉ. ऋचा औरंगाबादकर
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !