
पनवेल, १० जुलै (वार्ता.) – भारतीय वायूसेनेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी एअर मार्शल सतीश गोविंद इनामदार यांनी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमास नुकतीच भेट दिली. सनातन संस्थेचा आश्रम, साधकांची सेवा करण्याची तळमळ, आश्रमातील शिस्त हे सर्व पाहून ते भारावून गेले. त्यांनी स्वत:चा अमूल्य वेळ देऊन सर्व माहिती अत्यंत जिज्ञासेने जाणून घेतली. या वेळी पू. शिवाजी वटकर यांनी इनामदार यांना हिंदु धर्मासंबंधी ग्रंथ भेट दिले.
(निवृत्त) एअर मार्शल सतीश इनामदार यांनी सनातनचा आश्रम आणि साधक यांना गौरवले !
१. साधक प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या चुका आश्रमातील फलकावर लिहितात. हे पाहून त्यांना पुष्कळ विशेष वाटले. त्यांनी वायूसेनेच्या नोकरीमुळे अनेक ठिकाणी भ्रमंती केली. ‘स्वत:कडून झालेल्या चुका लिहिण्याचा भाग कुठेच पाहिला नाही’, असे ते उत्स्फूर्तपणे म्हणाले.
२. स्वयंपाकघरातील ‘First in First Out’ (आधी आलेली वस्तू आधी संपवण्याच्या) संदर्भातील कार्यपद्धतीचे त्यांनी कौतुक केले. (शिल्लक राहिलेला अन्नपदार्थ प्रथम संपवण्याची आश्रमात कार्यपद्धत आहे. – संकलक)
३. अन्य वर्तमानपत्रांप्रमाणे ‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयाला वर्षभर एकही दिवस सुट्टी नसते’, हे ऐकून आणि ‘साधकांची कार्याप्रतीची तळमळ’ पाहून त्यांना पुष्कळ आश्चर्य वाटले.
(निवृत्त) एअर मार्शल सतीश इनामदार यांचा परिचय![]() सतीश इनामदार हे वर्ष १९६१ मध्ये भारतीय वायूसेनेत भरती झाले. वर्ष १९६३ मध्ये ते ‘कमिशन्ड’ अधिकारी झाले. त्यांनी वर्ष १९६५ आणि १९७१ च्या पाकिस्तान समवेतच्या युद्धात सक्रीय भाग घेतला. वर्ष १९९९ च्या कारगिल युद्धातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. सैन्यातून वर्ष २००३ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर आता ते यू.पी.एस्.सी.च्या (भारतीय लोकसेवा आयोगाच्या) निवड समितीचे सदस्य आहेत. |

‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !