
इंफाळ (मणीपूर) – मणीपूर राज्यातील मोरेह शहरातून म्यानमार देशातील तामू शहरामध्ये गेलेल्या पी. मोह आणि एम्. अय्यरनार या दोन तरुणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. ‘मोरेह तमिळ संगम’ या संघटने सचिव के.बी.एम् मनियम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एका तामिळ मित्राला भेटायला गेले होते. मोरेह हे मणीपूरमधील भारत-म्यानमार सीमेवर वसलेले शहर आहे. मोरेहमध्ये दोघांच्या मृत्यूच्या बातमीनंतर उत्स्फूर्त ‘बंद’ पाळण्यात आला. मोरेह शहरात मेइटीस, कुकी, तमिळ, पंजाबी आणि इतर लोक रहातात. येथे तमिळ लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.
2 Tamils were shot dead in #Myanmar. The Tamil Sangam in the town suspected that they were gunned down by the Myanmar Army on suspicion that they were spies. @NewIndianXpress https://t.co/jTbzZS4sVF
— TNIE Tamil Nadu (@xpresstn) July 6, 2022
१. आतापर्यंत आमच्याकडे ‘या दोघांची हत्या का आणि कुणी केली ?, याचा कोणताही तपशील नाही; परंतु त्यांचे मृतदेह परत आणण्यासाठी उच्च स्तरावर चर्चा चालू आहे’, असे मोरेह येथील पोलीस अधिकारी आनंद यांनी सांगितले.
२. मनियम यांनी आरोप केला आहे की, या दोघांना म्यानमार सैन्याने सिद्ध केलेल्या ‘प्यू शॉ हेटी’ या संघटनाने गोळ्या घातल्या आहेत. आम्हाला सीमेपलीकडील लोकांकडून कळले आहे की, दोन व्यक्तींना प्यू शॉ हेटीने थांबवले आणि गोळ्या घातल्या.
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी