
कोल्हापूर, २ जुलै (वार्ता.) – ६ ते १४ जुलै या कालावधीत पंढरपूर येथे आषाढी यात्रा होत असून १० जुलै हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. आषाढी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गावांतील भाविक पंढरपूर येथे प्रवास करतात. कोरोनाच्या संसर्गामुळे यात्रा न झाल्याने या वर्षी जाणाऱ्या भाविक प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने ३०० गाड्यांचे नियोजन केले आहे. यात तालुक्यातील बसस्थानकातून थेट यात्रेच्या ठिकाणी आणि परत तालुक्याच्या ठिकाणी ही सेवा देण्यात येणार आहे. तरी अधिक माहितीसाठी जवळच्या आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा आणि अधिकाधिक प्रवाशांनी राज्य परिवहन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी केले आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !