रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले विचार

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. आश्रमातील ध्यानमंदिरात बसल्यावर सकारात्मकता वाढली आणि मन हलके झाले ! : ‘ध्यानमंदिरात ध्यानास बसल्यावर आवरण अल्प झाले ’, असे वाटले. नकारात्मकता न्यून होऊन सकारात्मकता वाढली आणि ‘मन हलके झाले’, असे जाणवले.’ – श्री. किशोर पिलाजी पडवळ (व्यावसायिक), खोपोली, रायगड.

२. ‘आश्रम पाहून ईश्वराचे अस्तित्व अनुभवण्यास मिळाले.’ – श्री. जनार्दन सखाराम जाधव, अध्यक्ष, बाबू मामा सामाजिक प्रतिष्ठान, खोपोली, रायगड.

३. ‘आश्रम पहातांना ‘न भूतो न भविष्यति ।’ असे सुंदर दैवी कार्य आहे’, असे वाटले.’ – श्री. अमोल म. शिंदे, भूमी संरक्षण जिल्हा संयोजक, हिंदु जागरण मंच, नगर, महाराष्ट्र.

४. ‘आश्रम पाहून मनाला समाधान प्राप्त झाले. आश्रमातील नियोजन सर्वाेत्कृष्ट वाटले.’ – श्री. बाळकृष्ण राजाराम बाईत, कात्रण, पोफळवणे, दापोली, जिल्हा रत्नागिरी.

५. ‘आश्रम पाहून ‘पुरातन हिंदु संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होऊ शकते’, असा विश्वास वाढला.’ – श्री. उल्हास रजनीनाथ वडोदकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई विभाग, बोरीवली (प.), मुंबई.

(सर्व सूत्रांचा दिनांक १२.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक