शुक्रवारच्या नमाजानंतर दगडफेक झाल्यास संबंधित मशिदीला टाळे ठोकावे !

भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांची मागणी

हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – नूपुर शर्मा यांच्या पैगंबरांविषयीच्या कथित अवमानाकारक विधानावरून मुसलमानांकडून शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसाचार करण्याच्या गेल्या काही घटनांच्या पार्श्‍वभूमीवर येथील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, शुक्रवार, १७ जून या दिवशी जो कुणी मशिदीमधील नमाजानंतर दगडफेक करील, त्या मशिदीच्या इमामाला (मशिदीमध्ये प्रार्थना करवून घेणार्‍याला) अटक करून त्या मशिदीला टाळे ठोकले पाहिजे.

संपादकीय भूमिका 

मुळात अशी मागणी करावीच लागू नये. सरकारने आता असा कायदाच बनवावा. फ्रान्समध्ये ज्या मशिदींमधून जिहादविषयी प्रसार केला जातो, त्या मशिदींना टाळे ठोकले जाते, तसेच आता भारतातही होणे आवश्यक आहे !