केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रहित

नवी देहली – जर स्त्री आणि पुरुष दीर्घकाळ एकत्र रहात असतील, तर तो विवाह मानला जाईल अन् या नात्यातून जन्माला आलेल्या (अनौरस) मुलांनाही वडिलांच्या मालमत्तेत अधिकार मिळेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. यासाठी ‘डीएन्ए चाचणी’ करून तो त्या पुरुषाचाच मुलगा आहे, हे सिद्ध करावे लागेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. विवाह न करता एकत्र रहाणार्या दांपत्याच्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटेकरी मानण्यास नकार देणारा केरळ उच्च न्यायालयाचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने रहित केला.
Illegitimate child of cohabiting couple to get assets share: #SupremeCourthttps://t.co/D31CvEN6TC pic.twitter.com/LoAn1vDCDx
— The Times Of India (@timesofindia) June 14, 2022
असेच प्रकरण उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री अन् काँग्रेसी नेते नारायण दत्त तिवारी यांच्यासंदर्भात घडले होते. रोहित शेखर हा त्यांचा अनौरस पुत्र होता, ज्याला त्यांच्या मालमत्तेतील वाटा नाकारण्यात आला होता. पुढे न्यायालयात रोहित हा त्यांचाच मुलगा असल्याचे सिद्ध झाले.
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’