(भाग १५)

३. घरात प्रवेश करतांना काय करावे ?
आश्रमात प्रवेश करण्यापूर्वी आपण पादत्राणे काढून पाय धुतो, तसेच घरात प्रवेश करण्यापूर्वी अशी कृती करावी. जर असे शक्य नसेल, तर घराच्या प्रवेशद्वारावर एका भांड्यात तीर्थ (पाण्यात तुळशीदल घालणे) ठेवावे आणि घरात प्रवेश करण्यापूर्वी तीर्थ आपल्या अंगावर शिंपडून पुढील श्लोक म्हणावा.
ॐ अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा ।
यः स्मरेत्पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतरः शुचिः ।।
अर्थ : जर एखादा अपवित्र (अशुद्ध) किंवा पवित्र (शुद्ध) असेल किंवा इतर सर्व परिस्थितीतही जो पुंडरीकाक्षाचे (श्रीविष्णूचे दुसरे नाव, ज्याचा शब्दशः अर्थ कमळासारखे नेत्र असा आहे) स्मरण करतो, तो बाह्य आणि अंतर् मनांतून शुद्ध होतो.
४. पाणी शिंपडतांना करावयाची प्रार्थना !
त्यानंतर स्नानगृहात जाऊन प्रथम पाय धुवावेत. स्वतःवर थोडे पाणी शिंपडून प्रार्थना करावी, ‘हे भगवंता, माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट व्हावे आणि जर माझ्या समवेत अनिष्ट शक्ती आल्या असतील, तर त्या या वास्तूमधून निघून जाव्यात अन् माझी अंतर्बाह्य शुद्धी व्हावी.’ आतापर्यंत आपण हे धर्मपालनांतर्गत करत होतो; परंतु आपल्याला याचा विसर पडला. तेव्हा ईश्वरीय नियोजनानुसार आता (‘कोरोना’ महामारीसारखे) आलेले संकट असे आचरण करण्यास आपल्याला भाग पाडत आहे.’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (८.२.२०२२)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !
‘स्वभावदोष न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी व्यष्टी साधनेलाच प्राधान्य द्यायला हवे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले