भारतात विरोधी पक्ष दुर्बल ! – श्री श्री रविशंकर

श्री श्री रविशंकर

वाशिंग्टन (अमेरिका) – भारताला कणखर आणि रचनात्मक विचार करणार्‍या विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. सध्याचे विरोधक अत्यंत दुर्बल आहेत. त्यामुळे सत्तास्थानावरील नेता निरंकुश वाटू शकतो; परंतु प्रत्यक्षात तसे नाही, असे प्रतिपादन ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी केले. केंद्रीय स्तरावर नेतृत्वाचा अभाव असल्यास ‘लोकशाही’ ही लोकशाही वाटत नाही. देशात न्यायव्यवस्था प्रबळ आहे, त्याविषयी काही शंका घेता येत नाही, असेही ते म्हणाले.

श्री श्री रविशंकर हे सध्या २ मासांच्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. त्यानिमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी वरील प्रतिपादन केले.