आसाममध्ये १६ जिहादी आतंकवाद्यांना अटक

गौहत्ती – आसाम पोलिसांनी ‘अल्-कायदा’शी संबंधित बांगलादेशस्थित ‘अन्सार-उल बांग्ला टीम’ या जिहादी आतंकवादी संघटनेचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. पोलिसांनी या संघटनेच्या १६ आतंकवाद्यांना आतापर्यंत अटक केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी आतंकवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केल्याविषयी आसाम पोलिसांचे कौतुक केले.

१. ‘दीर्घकाळ चालू असलेल्या मोहिमेच्या अंतर्गत आसाम पोलिसांनी ‘अन्सार-उल बांग्ला टीम’चे अनेक तळ उद्ध्वस्त केले. हे आसाम पोलिसांच्या धैर्याचे आणि समर्पणाचे खरे उदाहरण आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी ट्ीवट केले. ‘१८ एप्रिल २०२२ या दिवशी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ‘राज्यातील जिहादी जाळे नष्ट केले जाईल’, असा विश्‍वास व्यक्त केला होता.
२. यापूर्वी १५ एप्रिलला पोलिसांनी आसाममधील बारपेटा जिल्ह्यात ‘अन्सार-उल बांग्ला टीम’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ६ जणांना अटक केली होती.

संपादकीय भूमिका

या आतंकवाद्यांना आता फासावर लटकवण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !