अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठीच छत्रपती शिवरायांना निधर्मी ठरवण्याचे राजकारण्यांचे षड्यंत्र ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

‘छत्रपती शिवाजी महाराज यांना सेक्युलर ठरवण्याचे षड्यंत्र !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

मुंबई – महाराष्ट्रातील युवा पिढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारलेली आहे. तिची दिशा भरकटवण्यासाठी २० वर्षांपूर्वी राजकीय पक्षांनी काही जात्यंध संघटनांना हाताशी धरून इतिहासाची तोडमोड केली आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानप्रेमी होते, त्यांच्या सैन्यात मुसलमान सैन्य होते, त्यांनी मशिदी बांधल्या, मशिदींना देणग्या दिल्या, त्यांना मुसलमान गुरु होते’, अशी माहिती जाणीवपूर्वक सांगून छत्रपती शिवाजी महाराजांना ‘सेक्युलर’ (निधर्मी) ठरवण्याचा प्रकार चालू आहे. एकदा का छत्रपती शिवाजी महाराजांची अल्पसंख्यांकप्रेमी छबी निर्माण झाली की, उद्या आपल्यालाही त्यांचे नाव सांगून अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करून राजकीय स्वार्थ साधता येईल, असे राजकीय पक्षांचे षड्यंत्र आहे. छत्रपती शिवरायांना ‘सेक्युलर’ ठरवणे, हा त्यांच्या शौर्याचा अपमान आहे. अशांना हिंदूंनी ओळखले पाहिजे. छत्रपती शिवरायांचे ‘हिंदवी स्वराज्या’चे खरे विचार अर्थात् ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे विचार कृतीत आणले पाहिजेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘सेक्युलर’ ठरवण्याचे षड्यंत्र !’, या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

श्री. अभय वर्तक

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, प्रेरणा, राज्यकारभार शिकवायला हवा ! – लखन जाधव, प्रधान आचार्य, सव्यासाची गुरुकुलम्

या वेळी ‘सव्यासाची गुरुकुलम्’चे प्रधान आचार्य लखन जाधव म्हणाले की, आज कार्यकर्त्यांना केवळ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, या घोषणा द्यायला लावल्या जात आहेत; पण त्यांचे (छत्रपती शिवाजी महाराजांचे) विचार, प्रेरणा, राज्यकारभार शिकवला जात नसून तो शिकवायला हवा. महाराजांचे गड-दुर्ग भग्न होत असतांना त्यांचे रक्षण न करता त्यावर अवैधपणे मशिदी, दर्गे उभारले जात आहेत. छत्रपती शिवरायांनी जे ३६ वर्षे लढून मिळवले, ते धुळीस मिळवण्याचे काम चालू आहे.

छत्रपती शिवराय हे ‘सेक्युलर’ कधीच नव्हते ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास लेखक आणि अभ्यासक

अधिवक्ता सतीश देशपांडे

वर्ष १९६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, छत्रपती शिवराय नसते, तर पाकिस्तानची सीमा आपल्या आसपास दिसली असती. हे वाक्य पुष्कळच महत्त्वपूर्ण आहे, तसेच मोगल इतिहासकार तारुकी अली नरूला आणि आदिलशाह यांची कागदपत्रे पडताळल्यावर त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोकणात अनेक मशिदी उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख आहे. त्यामुळेच अफझलखानला पाठवले गेले. यावरून छत्रपती शिवराय हे ‘सेक्युलर’ कधीही नव्हते आणि नाहीत, हेच दिसून येते.


हे पहा –

हिन्दू जनजागृति समिति आयोजित : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांना सेक्युलर ठरवण्याचे षड्यंत्र !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !”

_____________________________

हिंदूंना ध्येयापासून विन्मुख करण्यासाठी जात्यंधांचे प्रयत्न चालू ! – ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, प्रवक्ते, राष्ट्रीय वारकरी परिषद

ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे

केवळ छत्रपती शिवरायांना ‘सेक्युलर’ करण्याचा प्रकार नाही, तर ‘ते देव मानत नव्हते’, ‘धर्म मानत नव्हते’, असाही ठसवण्याचा भयंकर प्रयत्न जात्यंध लोकांकडून चालू आहे; मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे देवाचे निस्सीम भक्त होते. केवळ हिंदूंना त्यांच्या ध्येयापासून विन्मुख करण्यासाठी जात्यंधांचे प्रयत्न चालू आहेत.