पुणे येथील ‘इतिहास संस्कृती कट्टा’ आणि डॉ. चंद्रशेखर गणेश पेशवे आयोजित व्याख्यानमाला !

पुणे – आदिलशाही आणि कुतुबशाहीवर मात करण्यासाठी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्रमण केले पाहिजे; म्हणून मिर्झाराजे जयसिंह यांनी शिवाजी महाराजांचे बलस्थान ओळखले आणि ते काबीज करण्याचा प्रयत्न केला. ओबडधोबड गडदुर्गांचा प्रदेश आणि मावळे हे शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे बलस्थान होते, असे मत इतिहास अभ्यासक विद्याचरण पुरंदरे यांनी व्यक्त केले. इतिहास संस्कृती कट्टा आणि डॉ. चंद्रशेखर गणेश पेशवे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘शिवाजी महाराजांची आग्रा भेट-पूर्वरंग’ या विषयावर भारत इतिहास संशोधन मंडळात व्याख्यान आणि चर्चासत्र यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्याचरण पुरंदरे आणि इतिहासतज्ञ मंदार लवाटे यांच्या पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी करण्यात आली.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !