हिंदूंना जागृत करणे आवश्यक ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, तेलंगाणा, प्रज्ञा भारती

श्री. गिरिधर ममिडी

जेव्हा ख्रिस्ती पंथ युरोपमध्ये पसरला, त्या वेळी अन्य सभ्यता नष्ट करण्यात आल्या. सेंट फ्रान्सिस झेविअर यानेही अशाच गोष्टी सांगितल्या आहेत. हे विष लोकांच्या बुद्धीमध्ये पेरले गेले असून त्यामुळे मंदिरांवरील आघाताच्या घटना वारंवार घडत आहेत. देशविरोधींची विचारसरणी समजून घेऊन त्यांचा प्रतिकार करायला हवा. तेलुगु देसम् पार्टीच्या काळातही विजयवाडा येथे उड्डाणपूल बनवतांना सर्व छोटी मंदिरे तोडण्यात आली. जगनमोहन रेड्डी सरकारच्या विरोधात केवळ हिंदुत्वाच्या सूत्रावर राजकारण केले जाते. त्यामुळे व्यक्तीगत राजकीय लाभातून प्रत्येक पक्ष कार्यरत आहे. मंदिरांवरील आघाताच्या या घटना राज्य सरकार रोखत नसेल, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. या सर्व घटना रोखण्यासाठी एकच उपाय म्हणजे हिंदूंना जागृत करणे होय.