सिद्धगिरी मठात संघाच्या २ दिवसांच्या बैठकीचा समारोप

कोल्हापूर, २ डिसेंबर – कोरोना संसर्गकाळात संघ स्वयंसेवकांनी अविरतपणे सेवा कार्य केले. यात काही स्वयंसेवकांना प्राणही गमवावा लागला. कोरोनानंतर संघ कार्याची गती अधिक वाढावी. संघ शताब्दी काळात संघ कार्याचा परिणाम समाजातील सर्व घटकांवरून दिसेल अशा कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. येथील सिद्धगिरी मठात पार पडलेल्या २ दिवसांच्या बैठकीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
करोनानंतर संघकार्य गतीने वाढावे – मोहन भागवत #mohanbhagwat #RSS https://t.co/2M2fUtXNGb
— LoksattaLive (@LoksattaLive) December 3, 2021
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक सिद्धगिरी मठावर झाली. या बैठकीत संघटनात्मक गोष्टींसमवेत सेवाकाम, ग्रामविकास, धर्मजागरण, गोसंवर्धन, पर्यावरण अशा उपक्रमांवरही चर्चा झाली. कोरोनामुळे संघाचे प्रशिक्षणवर्ग होऊ शकले नव्हते. आता ते कसे घेता येतील यावरही चर्चा झाली. बैठकीला सरकार्यवाह श्री. दत्तात्रय होसबाळे, माजी सरकार्यवाह श्री. भैय्याजी जोशी, सहसरकार्यवाह श्री. कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, श्री. अरुणकुमार, श्री. सुरेश सोनी, श्री. रामदत्त उपस्थित होते.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !