हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर येथे जिल्हा प्रशासनास निवेदन

कोल्हापूर, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – चीनच्या कपटनीतीमुळे भारत-चीन सीमेवर गेले काही मास तणाव निर्माण झाला आहे. चीनने भारताच्या भूमीत अतिक्रमण केले, तसेच सैन्यावर आक्रमणही केले होते. काही मासांपूर्वी भारताने ‘चिनी ॲप्स’वर बंदी घातली. गेल्या वर्षी भारत सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घातली होती. यंदाही चिनी फटाक्यांवरील बंदी कायम रहावी, यासाठी भारत सरकारने जागृती करावी. अवैध मार्गांनी चिनी फटाके भारतात आणले जाऊन त्यांची विक्री होऊ नये, याची दक्षता घ्यावी. जे विक्रेते चिनी फटाक्यांची विक्री करतात, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ ऑक्टोबर या दिवशी कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेना शाहूवाडी तालुकाप्रमुख श्री. दत्तात्रय पोवार, शिवसेना उंचगाव विभागप्रमुख श्री. दीपक रेडेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री. विनायक जाधव, शिरोलीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. सतीश पाटील, भाजपचे श्री. उत्तम पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, दीपक कातवरे उपस्थित होते.
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील उर्वरित ४ कळस सोन्याचे करण्याचा संकल्प !
(म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’