राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील विशेष सदर : २८.१०.२०२१

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या


धर्मांध पतीकडून विवाहानंतर ९व्या दिवशीच (‘करवा चौथ’च्या दिवशी)  हिंदु पत्नीची हत्या !

रक्तरंजित लव्ह जिहाद !

प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या नवनवीन घटना समोर येत आहेत. यावर सरकार किंवा पोलीस काहीही करणार नाहीत, हे लक्षात घ्या आणि आपले कुटुंब वाचवण्यासाठी आताच हिंदु राष्ट्राच्या दिशेने पाऊल टाका !

उत्तर देहली – १४ ऑक्टोबर या दिवशी आझाद खान याने १९ वर्षीय हिंदु युवतीशी विवाह केला. त्यानंतर करवा चौथच्या रात्रीच त्याने सुरा भोसकून तिची हत्या केली. लग्नानंतर केवळ ९ दिवसांनी धर्मांधाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याने ‘लव्ह जिहाद’चे भयानक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी धर्मांध आरोपीला अटक केली आहे.

पीडिता एका खासगी आस्थापनात नोकरी करत होती. तेथे आझादशी तिचा परिचय झाला होता. दोघांमध्ये प्रेम जुळल्यानंतर युवतीने तिच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन आझादशी न्यायालयीन विवाह केला. (धर्मांधांच्या मनात प्रेम वगैरे काही नसते, तर त्यांना केवळ हिंदु मुलींचा उपभोग घ्यायचा असतो, हे आतातरी ओळखावे आणि त्यांच्यापासून दूर रहावे ! – संपादक) पोलिसांनी सांगितले की, २५ वर्षीय आरोपी आझाद खान टेंपोचालक आहे. तो बुराडी येथे त्याची हिंदु पत्नी कीर्ती समवेत रहात होता. पोलिसांना बुराडीच्या पश्चिम कमल विहारमधील एका घरात मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी मृतदेह कह्यात घेतला. मृत पीडितेच्या आईने तिच्या जावयावर संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला. पोलिसांच्या मते, २२ आणि २३ ऑक्टोबरच्या रात्री आझादचा पत्नीशी वाद झाला होता. त्यानंतर त्याने तिच्यावर सुर्‍याने वार केले. यात तिचा मृत्यू झाला. ज्या घरात तिची हत्या झाली, त्या घराच्या छतावरून पोलिसांनी सुरा कह्यात घेतला आहे.


मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाकडून खोट्या नावाने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतरासाठी तिच्यावर दबाव !

  • आरोपीने पीडितेकडून ५० सहस्र रुपये हडप केले
  • हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणल्यावर पोलिसांकडून तक्रार नोंद
  • प्रतिदिन लव्ह जिहादच्या घटना घडत असतांना आणि उत्तरप्रदेश राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा असतांना पोलीस तक्रार नोंद का करत नाहीत ?
  • अशा पोलिसांची त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करा ! पोलिसांच्या अशा भूमिकेमुळेच धर्मांधांचे फावते आणि हिंदु मुलींना फसवण्याचे प्रकारही वाढतात !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथे धर्मांधाने खोट्या नावाने एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिची अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून ५० सहस्र रुपयेही हडप केले. या प्रकरणी हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जमून पोलिसांवर दबाव आणल्यावर पोलिसांनी तक्रार नोंदवली. आरोपी पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नई मंडी क्षेत्रातील पीडितेने सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका युवकाने आकाश नावाने तिच्याशी प्रेम केले. एक दिवस त्याने तिला शीतपेयातून अमली पदार्थ पाजले आणि तिच्यावर बलात्कार करून त्याची चित्रफीत बनवली. यानंतर त्याने स्वत:चे नाव वसीम असल्याचे सांगून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला, तसेच तिची अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून ५० सहस्र रुपयेही उकळले.

पीडितेने आरोप केला की, ती गर्भवती झाल्यावर आरोपीने तिच्याशी बनावट लग्न केले. त्यानंतर तिला मारहाण करणे चालू केले. यात तिचा गर्भपात झाला. पीडितेने आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर तिच्या नातेवाइकांना माहिती दिली. याची माहिती समजताच हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी आरोपीवर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव आणला. त्यानंतर आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली.


धर्मांधाने हिंदु नावाने युवतीशी विवाह करून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहाद !

  • ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करूनही राज्यातील ‘लव्ह जिहाद’च्या घटना न्यून होत होतांना दिसत नाहीत. त्यामुळे या कायद्याची अधिक कठोरतेने कार्यवाही करणे आवश्यक आहे !
  • लव्ह जिहाद नष्ट करण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटनच आवश्यक !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथे महंमद गुलाम रसूल याने ‘बबलू’ नावाने एका हिंदु युवतीशी मैत्री केली. त्यानंतर स्वत: अनाथ असल्याचे सांगून तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर आरोपीने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. एक दिवस आरोपी पीडितेला देहव्यापारासाठी दुचाकीवरून घेऊन जात होता. तेव्हा पीडितेने दुचाकीवरून उडी मारली आणि पलायन केले. त्यानंतर स्थानिक लोकांच्या साहाय्याने तिने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील अन्वेषण चालू आहे.

पोलिसांना माहिती देतांना पीडितेने सांगितले की, ती अहियापूर भागातील मिर्झापूर येथे रहाणारी आहे. लहानपणी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. एक वर्षापूर्वी तिचा बबलू राय (खरे नाव महंमद गुलाम रसूल) याच्याशी परिचय झाला. एक दिवस आरोपीने तो अनाथ असल्याचे सांगितले आणि तिला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर दोघांनी १७ ऑगस्ट २०२० या दिवशी न्यायालयीन विवाह केला. तेथे आधार कार्ड मागितले गेले, तेव्हा त्यावर त्याचे खरे नाव महंमद गुलाम रसूल असल्याचे आढळून आले. त्यामुळे पीडितेने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने पीडितेला तिचे अश्लील चित्रीकरण दाखवून ते सर्वत्र प्रसारित (व्हायरल) करण्याची धमकी दिली आणि तिच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. (हिंदु मुलींना धर्मशिक्षण नसल्याने त्या विवाहापूर्वीच शारीरिक संबंध ठेवतात आणि त्याचा लाभ धर्मांध अशा प्रकारे अश्लील चित्रफीत बनवून युवतींना स्वत:च्या नियंत्रणात ठेवून वाटेल ते करून घेण्यासाठी (ब्लॅकमेल करण्यासाठी) करतात ! – संपादक) पीडितेच्या मते आरोपी ३ मुलांचा पिता आहे. लग्न केल्यानंतर २ मासांनी त्याने पीडितेचा छळ चालू केला, तसेच तिच्यावर वेश्याव्यवसाय करण्यासाठी दबाव निर्माण केला. तिने नकार दिल्यावर तिची हत्या करण्याची धमकी दिली. जीव वाचवण्यासाठी तिने त्याच्या मनाप्रमाणे केले. घरातून बाहेर जातांना तो घराला बाहेरून टाळे लावून जात असे. त्यामुळे तिला पलायन करता आले नाही. १ वर्षाने तिने संधी साधून दुचाकीवरून उडी मारून पलायन केले.


आसाममध्ये धर्मांधाचा खरी ओळख लपवून हिंदु महिलेशी विवाह आणि नंतर तिच्याकडील पैसे घेऊन पलायन !

आरोपीकडून पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ !

  • धर्मांधांकडून खरी ओळख लपवून हिंदु मुलींना फसवण्याचे प्रमाण वाढले असून ही राष्ट्रीय समस्या बनली आहे. त्यामुळे हिंदूंच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर याची नोंद घेऊन वेळीच लव्ह जिहादविरोधी कायदा करून उपाययोजना काढणे आवश्यक  !
  • हिंदु मुलींनीही ‘धर्मांधांच्या मनात प्रेम वगैरे काही नसते, तर केवळ ते केवळ त्यांना उपभोगण्यासाठी प्रेमाचे नाटक करतात’, हे ओळखावे आणि धर्मांधांपासून दूरच रहावे !

भुवनेश्वर (आसाम) – येथील होजई जिल्ह्यामध्ये एका धर्मांधाने त्याची खरी धार्मिक ओळख लपवून हिंदु महिलेशी विवाह केला. त्यानंतर काही मासांनी तिच्याकडील पैसे घेऊन त्याने पलायन केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील अन्वेषण चालू आहे.

आसामच्या धेमाजी जिल्ह्यात रहाणार्‍या पीडितेने सांगितले की, धर्मांध आरोपी होजई जिल्ह्यातील नखुटी येथे रहाणारा आहे. तमिळनाडूमध्ये काम करत असतांना दोघांचा परिचय झाला. धर्मांधाने त्याची खरी ओळख लपवून आणि एक हिंदु म्हणून तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर त्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे चालू केले. काही मासांनी त्याने तिच्याकडील रोकड घेऊन आसामच्या नखुटी भागात पलायन केले. धर्मांधाने पलायन केल्यानंतर पीडितेने त्याचा शोध घेतला, तेव्हा त्याची खरी ओळख समोर आली आणि तो हिंदु नसून मुसलमान असल्याचे समजले. (लव्ह जिहाद अस्तित्वात नाही, तर ते आंतरधर्मीय प्रेम असते, असे म्हणणार्‍यांना ओळख लपवून लग्न करून नंतर फसवणार्‍या धर्मांधांविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक) त्यानंतर तिने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. लुमडिंग पोलीस ठाण्याचे प्रभारी एस्.के. सरमा यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, पीडितेने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या साहाय्याने तिच्या पतीच्या विरोधात पोलीस अधीक्षकांच्या समक्ष तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी आरोपीला पकडण्यासाठी आरोपीच्या गावात पोलिसांचा ताफा पाठवून त्याला अटक केली. आरोपीला होजईच्या स्थानिक न्यायालयामध्ये उपस्थित करण्यात आले. पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.