‘ॐ निर्विचार’ नामजपाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले आणि त्रास नसलेले साधक अन् संत यांच्यावर होणारा परिणाम

नामजपाविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले ४ साधक, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळीचे ४ साधक, आध्यात्मिक त्रास नसलेले ३ साधक, आध्यात्मिक त्रास नसलेले अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळीचे ४ साधक, १ दैवी बालिका आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, असे एकूण १६ साधक अन् १ संत सहभागी झाले. चाचणीतील साधक आणि संत यांना ५ ते ११ जुलै २०२१ या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ निर्विचार’ हा नामजप १० मिनिटे ऐकवण्यात आला.

या चाचणीत ‘ॐ निर्विचार’ नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे. तसेच पुढील ३ सूत्रांच्या अनुषंगानेही अभ्यास करण्यात आला.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

अ. साधकांवर अमावास्येचा होणारा परिणाम अभ्यासणे (९.७.२०२१ या दिवशी अमावास्या होती.)

आ. स्त्रियांची मासिक पाळी चालू असतांना त्यांच्यावर होणारा परिणाम अभ्यासणे (५ ते ११ जुलै २०२१ या कालावधीत चाचणीतील काही साधिकांची मासिक पाळी चालू होती.)

इ. स्त्रियांची मासिक पाळी चालू असतांना त्यांच्या जवळ नामजपाला बसलेल्या साधकांवर होणारा परिणाम अभ्यासणे

१ अ. चाचणीतील साधकांवर ‘ॐ निर्विचार’ नामजपाचा सकारात्मक परिणाम होणे : ‘ॐ निर्विचार’ नामजप ऐकल्याने चाचणीतील साधकांवर झालेले परिणाम दर्शवणारी सारणी पुढे दिली आहे.

१ आ. चाचणीतील साधकांवर ‘ॐ निर्विचार’ नामजपाचा परिणाम ५ दिवस टिकून रहाणे : ११.७.२०२१ या दिवशी ‘ॐ निर्विचार’ नामजपाचा प्रयोग संपल्यावर दुसर्‍या दिवसापासून (१२.७.२०२१ पासून) प्रतिदिन साधकांची ते त्यांच्या मूळ नोंदीला (Baseline Reading) येईपर्यंत निरीक्षणे करण्यात आली. या कालावधीत त्यांना ‘ॐ निर्विचार’ नामजप ऐकवण्यात आलेला नव्हता. चाचणीतील सर्व साधक १६.७.२०२१ या दिवशी त्यांच्या मूळ नोंदीवर आले. यातून साधकांवर ‘ॐ निर्विचार’ नामजपाचा परिणाम सुमारे ५ दिवस टिकला, असे लक्षात आले.

२. चाचणीतील सर्व साधकांवर अमावास्येचा परिणाम स्पष्टपणे दिसून येणे

५.७.२०२१ या दिवशीच्या तुलनेत ६.७.२०२१ या दिवशी चाचणीतील साधकांवर नामजपापूर्वी त्रासदायक आवरणाचे प्रमाण अल्प होते; पण ७.७.२०२१ पासून वाढत जाऊन ९.७.२०२१ या दिवशी (९.७.२०२१ या दिवशी अमावास्या होती.) किंवा काही साधकांच्या बाबतीत १०.७.२०२१ या दिवशी ते सर्वाधिक आणि ११.७.२०२१ या दिवशी अल्प झाले. प्रत्येक दिवशी ‘ॐ निर्विचार’ हा नामजप केवळ १० मिनिटे ऐकून नामजपातील चैतन्यामुळे साधकांवरील त्रासदायक आवरण अल्प किंवा नाहीसे होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

यातून ‘अमावास्येच्या २ दिवस आधीपासून त्रास वाढतो, अमावास्येला तो सर्वाधिक असतो आणि त्यानंतर पुढील २ दिवस तो असतो; पण आधीच्या तुलनेत त्रासाचे प्रमाण थोडे उणावते’, असे लक्षात येते. याविषयी मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘‘अमावास्येच्या २-३ दिवस आधीपासून त्रास वाढतो; पण पौर्णिमेच्या वेळी पौर्णिमा झाल्यावर पुढील २-३ दिवस त्रास वाढतो. याचे कारण हे की, अमावास्येच्या २-३ दिवस आधीपासून मोठ्या वाईट शक्ती त्रासदायक शक्ती मिळवतात आणि पौर्णिमेला त्या त्रासदायक शक्ती प्रक्षेपित करतात.’’ यामुळे अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी त्रास वाढतात.

सौ. मधुरा कर्वे

३. चाचणीतील साधिकांची मासिक पाळी चालू असतांना त्यांच्यावर झालेले परिणाम

५.७.२०२१ या दिवशी चाचणीतील दोन साधिकांचा मासिक पाळीचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसर्‍या दिवशी नामजपापूर्वी दोघींमध्ये नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अल्प होते. तिसर्‍या अन् चौथ्या दिवशी खरेतर ते आणखी अल्प होणे अपेक्षित होते; पण उलट ते वाढत गेले आणि ९.७.२०२१ या दिवशी ते सर्वाधिक झाले. याचे कारण हे की, तिसर्‍या दिवसापासून त्या दोघींवरील मासिक पाळीचा परिणाम उणावला असला, तरी अमावस्येचा परिणाम मात्र होण्यास आरंभ झाला होता.

थोडक्यात या प्रयोगातून अमावास्येच्या आधी २-३ दिवस साधकांच्या आध्यात्मिक त्रासांत वाढ का झाली ? हे लक्षात येते. या काळात साधकांभोवती अधिक प्रमाणात त्रासदायक शक्तीचे आवरण येत असल्याने त्यांना निरुत्साह जाणवणे, विकल्प येणे, निराशा येणे, असे मानसिक त्रास होतात.

४. चाचणीतील साधिकांची मासिक पाळी चालू असतांना त्यांच्या जवळ नामजपाला बसलेल्या अन्य दोन साधकांवर फारसा परिणाम झाल्याचे दिसून न येणे

सर्वसाधारणपणे मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांकडून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या सभोवताली होतो. नामजप प्रयोगात मासिक पाळी चालू असलेल्या दोन साधिकांच्या जवळ अन्य २ साधक बसले होते. त्या दोघांवर मासिक पाळी चालू असलेल्या साधिकांकडून प्रक्षेपित होणार्‍या नकारात्मक स्पंदनांचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. याचे कारण हे की, या दोन्ही साधकांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने त्यांच्यामध्ये त्रासदायक स्पंदनांशी लढण्याची क्षमता आहे आणि ‘ॐ निर्विचार’ नामजपातून त्यांनी चैतन्य ग्रहण केल्याने त्यांच्यातील क्षमतेत आणखी वाढ झाली.

५. ‘ॐ निर्विचार’ नामजपाच्या  संदर्भातील महत्त्वाची सूत्रे

‘ॐ निर्विचार’ नामजप ऐकल्याने चाचणीतील सर्वच साधकांवर सकारात्मक परिणाम झाले असले, तरी हा नामजप कुणी करावा आणि कुणी करू नये, तसेच किती वेळ करावा, हे समजण्यासाठी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

५ अ. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांनी ‘ॐ निर्विचार’ हा नामजप करू नये; त्यांनी आध्यात्मिक उपायांसाठी सांगितलेलेच नामजप करावेत : ‘ॐ निर्विचार’ हा नामजप निर्गुणाकडे घेऊन जाणारा आहे. आध्यात्मिक त्रास असणारा साधक हा नामजप करू लागल्यास त्याला वाईट शक्तींकडून विरोध होऊ शकतो. हा विरोध तीव्र स्वरूपाचा झाला, तर त्रास असणार्‍या साधकाच्या त्रासाची तीव्रता वाढू शकते आणि त्यासाठी संतांना नामजप करण्यासाठी वेळ द्यावा लागू शकतो. त्यामुळे वाईट शक्तींचा तीव्र, मध्यम आणि मंद त्रास असलेल्या साधकांनी त्यांना आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी सांगितलेलेच नामजप करावेत. या साधकांसाठी वाईट शक्तींचा त्रास दूर होणेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी उपायांचा कालावधी पूर्ण झाल्यावरही उपायांमध्ये आलेल्या नामजपांपैकी एखादा नामजप उर्वरित वेळी येता-जाता करावा.’ (संदर्भ : https://www.sanatan.org/mr/a/79145.html)

५ आ. ‘आध्यात्मिक त्रास असणारे अन् ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असणारे साधक ‘ॐ निर्विचार’ हा नामजप त्यांना असणार्‍या जपाच्या एकूण वेळेपैकी २० टक्के वेळ करू शकतात.’ (संदर्भ : https://www.sanatan.org/mr/a/79145.html)

५ इ. आध्यात्मिक त्रास नसणार्‍या साधकांना ‘निर्विचार’ हा जप करणे कठीण जात असेल, तर त्यांनी ‘ॐ निर्विचार’ हा नामजप करण्याचा प्रयत्न करावा : ‘निर्विचार’ हा नामजप ‘निर्गुण’ स्थितीला नेणारा आहे. त्यामुळे कुलदेवतेचा नामजप करणार्‍या साधकांना किंवा ६० टक्क्यांपेक्षा कमी आध्यात्मिक पातळीच्या साधकांना हा नामजप करणे कठीण होऊ शकते. यासाठी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या जपाच्या बरोबर हा नामजप करण्याचा प्रयत्न करावा. हा नामजप करणे जमू लागल्यास तो निरंतर करावा. कारण शेवटी साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाऊन पूर्णवेळ हाच नामजप करावयाचा असतो. साधकांना ‘निर्विचार’ हा जप करणे कठीण जात असेल, तर त्यांनी ‘ॐ निर्विचार’ हा नामजप करून बघावा.’ (संदर्भ : https://www.sanatan.org/mr/a/79145.html)

५ ई. आध्यात्मिक त्रास नसणारे अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या साधकांना ‘निर्विचार’ हा जप करणे कठीण जात असेल, तर त्यांनी ‘ॐ निर्विचार’ हा नामजप करावा : ‘निर्विचार’ हा जप होण्यासाठी साधकाची आध्यात्मिक पातळी कमीतकमी ६० टक्के असणे, म्हणजे त्याच्या मनोलयाचा आरंभ होणे आवश्यक आहे. त्यानंतर तो साधक निर्विचार स्थितीला जाऊ शकतो. ‘निर्विचार’ हा नामजप ‘निर्गुण’ स्थितीला नेणारा असल्याने आध्यात्मिक त्रास नसलेले अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या साधकांनी ‘निर्विचार’ हाच नामजप करावा. साधकांना ‘निर्विचार’ हा जप करणे कठीण जात असेल, तर त्यांनी ‘ॐ निर्विचार’ हा नामजप करून बघावा.’ (संदर्भ : https://www.sanatan.org/mr/a/79145.html)

६. ‘ॐ निर्विचार’ नामजपाच्या प्रयोगाचा निष्कर्ष

‘ॐ निर्विचार’ नामजपाच्या संदर्भात केलेल्या संशोधनात्मक चाचणीतून हा जप आध्यात्मिक त्रास नसणारे अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या साधकांसाठी उपयोगी पडतो, हे लक्षात येते. यावरून याची एकूणच परिणामकारकता लक्षात येते. साधकांना ‘निर्विचार’ हा जप करणे कठीण जात असेल, तर त्यांनी ‘ॐ निर्विचार’ हा नामजप करून बघावा. त्याचा सराव झाला की, पुढे हाच जप चालू ठेवावा.

कुलदेवतेच्या सगुण उपासनेच्या नामजपापासून गुरुकृपायोगानुसार साधनामार्गातील शेवटच्या ‘निर्विचार’ या निर्गुण स्थितीला घेऊन जाणार्‍या नामजपापर्यंत साधकांचा साधनाप्रवास करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.९.२०२१)

ई-मेल : [email protected]


अमावास्येच्या दिवशी (९.७.२०२१ या दिवशी) सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत सर्वाधिक प्रमाणात वाढ होणे

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

नामजप ऐकल्यानंतर चाचणीतील सातही दिवस सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली; पण अमावास्येच्या दिवशी (९.७.२०२१ या दिवशी) मात्र सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत सर्वाधिक प्रमाणात वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

थोडक्यात, संतांवर वातावरणातील पालटांचा परिणाम अत्यल्प प्रमाणात होत असला, तरीही संतांमधील चैतन्य मात्र सदैव समष्टीच्या कल्याणार्थ कार्यरत असते, हेच यातून लक्षात येते. यासाठी संतांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !