असुरक्षित महाराष्ट्र !
कोल्हापूर, ६ ऑक्टोबर – शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील कु. आरव राजेश केसरे या ६ वर्षाच्या बालकाचे अपहरण करून गळा आवळून हत्या केल्याची घटना ५ ऑक्टोबरला पहाटे उघडकीला आली. या बालकाच्या मृतदेहावर हळद-कुंकू, गुलाल आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे वरिष्ठ अधिकार्यांसह घटनास्थळी उपस्थित झाले असून मारेकर्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.
३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता आरव मित्रांसमवेत अंगणात खेळत होता. साडेसहा वाजता तो अचानक बेपत्ता झाला. नातेवाइकांनी शोध घेतला; पण रात्री उशिरापर्यंत आरव सापडू शकला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात आरव बेपत्ता असल्याची तक्रार प्रविष्ट केली. ४ ऑक्टोबर या दिवशी पोलिसांसह नातेवाइकांनी आरवचा शोध घेतला असता तो सापडला नाही. ५ ऑक्टोबर या दिवशी सकाळी एका व्यक्तीच्या घराच्या मागे त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अधिक अन्वेषण चालू केले असून आरवचे कुणी आणि कशासाठी अपहरण केले याचे अन्वेषण करण्यात येत आहे.
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
सत्संगात नसलेल्यांची स्थिती भरकटलेल्या पतंगासारखीच – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
निर्णयक्षमता गमावलेल्या युवकांसाठी भागवत ग्रंथ आधार वाटतो ! – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप