‘देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणी काहीही बोलू शकतो’, असे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हे हिंदूंच्या देवतांचा अथवा श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला, तर लगेच म्हणतात, तर मग नथुराम गोडसे यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल, तर त्या वेळी त्यांची भूमिका उलट का असते ?

नवी देहली – मोहनदास गांधी यांच्या २ ऑक्टोबरला झालेल्या जयंतीच्या निमित्त सामाजिक माध्यमांतून ‘नथुराम गोडसे’ या नावाने ‘ट्रेंड’ (एखाद्या विषयावर घडवून आणली गेलेली चर्चा) करण्यात आला होता. त्यावर भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी टीका केली आहे. ‘अशा दायित्वशून्य वर्तनाने देशाची लाज काढू नका. अशांची जाहीरपणे लाज काढली पाहिजे’, असे वरुण गांधी म्हणाले.
वरुण गांधी म्हणाले की, भारत नेहमीच आध्यात्मिक महासत्ता राहिला आहे. गांधी यांनीच आपल्या देशाच्या आध्यात्मिक पायामध्ये भर घातली आणि आपल्याला नैतिक अधिकार दिला, जी आजही आपली सर्वांत मोठी शक्ती आहे. (गांधींमुळे नाही, तर ऋषिमुनी, संत यांच्यामुळे भारत नेहमीच आध्यात्मिक गुरु राहिला आहे, हे गांधी यांनी लक्षात ठेवायला हवे. – संपादक) गांधी आणि त्यांच्या आदर्शांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला जो सन्मान मिळाला आहे, तो विसरता येणार नाही.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !