बीड जिल्ह्यातील ७ तालुक्यांत अतीवृष्टी !

प्रतिकात्मक छायाचित्र

बीड – येथे ४ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या पावसाने जिल्हा जलमय झाला आहे. येथील बीड, पाटोदा, अष्टी, गेवराई, अंबेजोगाई, केज, शिरूर या ७ तालुक्यांमध्ये अतीवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या भरून वहात आहेत. गेवराई तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

येथे झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतीपिकांची मोठी हानी झाली आहे. काही ठिकाणी छोटे बंधारे फुटले असून मांजरा नदीला पूर आला आहे. गोदावरीसह अमृता नदीही दुथडी भरून वहात आहे. अमृता नदीला आलेल्या पुरामुळे गेवराई-शेवगाव राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली आहे.