तालिबान, पाक आणि चीन १ वर्षानंतर भारतावर आक्रमण करतील ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारत या आक्रमणासाठी सिद्ध आहे का ? हे आक्रमण होण्याची वाट पहाण्यापेक्षा भारताने आक्रमक होऊन पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करून ते कह्यात घ्यावे !

नवी देहली – तालिबानची अफगाणिस्तानमध्ये सत्ता आल्यानंतर पहिल्या वर्षात त्यांचे मध्यम विचारांचे नेते सरकारमध्ये असतील. या पहिल्या वर्षात प्रांतीय नेते अमानुष तालिबानी असतील. एका वर्षानंतर अफगाणिस्तान सुरक्षित झाल्यावर तालिबान, पाकिस्तान आणि चीन भारतावर आक्रमण करतील, असा दावा भाजपचे वरिष्ठ नेते अन् खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्वीट करून केले आहे.