अनेक दिवसांपासून पडलेला खड्डा न बुजवणारे प्रशासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? प्रशासनाने आतातरी रस्त्यात अन्यत्र कुठे खड्डे नसल्याची निश्चिती करावी.- संपादक

सातारा, ९ ऑगस्ट (वार्ता.) – शहरातील गुरुवार बागेसमोर गत काही दिवसांपासून खड्डा पडला आहे. तो खड्डा दिवसाही वाहनचालकांना दिसत नाही. ६ ऑगस्टच्या रात्री १० वाजता हा खड्डा चुकवण्यासाठी अचानक वळण घेतल्यामुळे टेम्पो आणि दुचाकी यांच्यात धडक झाली. या अपघातामध्ये पिलाणी येथील ३२ वर्षीय युवक विनायक संपतराव साळुंखे यांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी विनायक यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात भरती केले; मात्र तेथील आधुनिक वैद्यांनी त्यांना मृत घोषित केले. विनायक हे व्यवसायाने छायाचित्रकार होते.
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
लोहगडावरील मृत्यू घातपातच !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !