(म्हणे) ‘भारत आणि पाक यांच्यातील चर्चेमध्ये रा.स्व. संघाची विचारसरणी आड येते !’

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा जावईशोध !

पाकिस्तान हा ‘आतंकवादी देश’ असून त्याच्याशी कधीही चर्चा केली जाऊ शकत नाही, हे इम्रान खान यांनी नेहमीच लक्षात ठेवायला हवे. पाकला भारताशी चर्चा करण्याची इतकीच हौस असेल, तर त्याने प्रथम पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा, पाकपुरस्कृत आतंकवाद नष्ट करावा, भारतात आतंकवादी कारवाया केल्याच्या प्रकरणी हानीभरपाई द्यावी आणि मगच चर्चेसाठी भारताकडे विनवणी करावी !

(डावीकडे) पाकचे पंतप्रधान इम्रान खान (उजवीकडे) रा.स्व.संघाचे कार्यकर्ते

ताश्कंद (उझबेकिस्तान) – आम्ही भारताला सांगू इच्छितो की, त्याच्यासोबत सुसंस्कृत शेजारी म्हणून एकत्र रहाण्याची आम्ही बर्‍याच काळापासून वाट पहात आहोत; पण काय करणार ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आड येत आहे, असे फुकाचे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाक यांच्यामध्ये चर्चा न होण्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना केले.