भारताचे आणखीन तुकडे होऊ न देण्‍यासाठी ‘धर्मांतरबंदी’ कायदा आणायला हवा ! – के. उमाशंकर, हिंदु देवालय परीरक्षण समिती, कृष्‍णा जिल्‍हा समन्‍वयक, आंध्रप्रदेश

के. उमाशंकर

हिंदूंच्‍या मंदिरांतील निधी हिंदूंसाठी आणि हिंदु धर्मासाठी वापरला जात नाही, तर तो सरकारी कामांसाठी वापरला जातो. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नाही. त्‍यामुळे धर्मांतर वाढत आहे. दळणवळण बंदीमध्‍ये मंदिरे बंद झाली आणि पुजार्‍यांचे अतिशय हाल झाले. चर्चमधील पाद्य्रांना मात्र ‘डिजिटल’ यंत्रणेद्वारे पैसे मिळत राहिले. मंदिरांतील निधी हिंदूंच्‍या धर्मरक्षणासाठी वापरला जायला हवा. आंध्रप्रदेश आणि तेलंगाणामध्‍ये पूर्वीपासूनच अतिशय मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. पूर्व आणि पश्‍चिम गोदावरी परिसरात ५० चर्च पहायला मिळतील. भारताचे पुढे आणखीन २-३ तुकडे झालेले बघायचे नसतील, तर देशात ‘धर्मांतरबंदी’चा कायदा आणायला हवा.