पुणे – मानव संस्कृतीने निसर्ग प्रकृतीशी इतर नैसर्गिक घटकांप्रमाणे जुळवून न घेता उलट त्याच्यावर स्वार होण्याचा प्रयत्न केला, तर मानवजात संकटात येईल, असे मत राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी ९ जुलै या दिवशी व्यक्त केले. महाकवी कालिदास रचित ऋतुसंहार या संस्कृत काव्याचा ऋतुसंहार…एक रसानुवाद या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सिग्नेट पब्लिकेशनच्या वतीने महाकवी कालिदासदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. डॉ. ज्योती रहाळकर यांनी हा अनुवाद केला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > महाकवी कालिदास यांच्या ऋतुसंहार या संस्कृत काव्याच्या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन
महाकवी कालिदास यांच्या ऋतुसंहार या संस्कृत काव्याच्या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन
नूतन लेख
- श्रीरामनवमीला गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण होऊनही त्यांनी ७ गोवंशियांचे प्राण वाचवले !
- मोशी, चिखली (पुणे) येथे ‘नीलेश बोराटे सोशल फाऊंडेशन’चा श्रीरामनवमी उत्सव !
- पुणे येथे होर्डिंग कोसळल्याच्या प्रकरणी होर्डिंग मालकाला नोटीस !
- पुणे येथील ‘सिटी इंटरनॅशनल स्कूल’कडून ‘आर्.टी.ई.’तील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचा आरोप !
- नाशिक येथे अवैध सावकार वैभव देवरे याने भाजप पदाधिकार्याकडून २० लाख रुपयांच्या बदल्यात ३ कोटी रुपयांची वसुली केली !
- महाराष्ट्रात लोकसभेचे पहिल्या टप्प्याचे मतदान ५४.८५ टक्के !