गोव्यातील हिंदूंना जिहादी रोहिंग्यांपासून वाचवा ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारत माता की जय’ संघटना

अशी मागणी का करावी लागते ?

प्रा. सुभाष वेलिंगकर,

पणजी – छोट्याशा गोव्यातही रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान मिळून अंदाजे ८५ सहस्र जिहादी घुसखोर असून गोव्यातील हिंदूंना जिहादी रोहिंग्यांपासून वाचवा, अशी मागणी ‘भारत माता की जय’ संघटनेचे संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ३ जून २०२१ या दिवशी बंगालचे भाजपा नेते डॉ. अनिर्बान गांगुली यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व भाजप नेत्यांना बंगालमध्ये रोहिंग्या मुसलमानांनी हिंदूंच्या विरोधात केलेल्या भीषण हिंसाचाराची माहिती दिली. छोट्याशा गोव्यातही सुमारे ८५ सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान असलेल्या जिहादी घुसखोरांना सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकगठ्ठा मतांच्या लालसेने सुप्रस्थापित केले आहे. ते सर्व अड्डे भाजप, काँग्रेस आणि आप या राजकीय पक्षांच्या नेत्यांना ठाऊक आहेत. गोव्यात श्री परशुराम गोमंतक सेना, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य देशप्रेमी संघटना यांनी अनेकदा लेखी निवेदने मुख्यमंत्र्यांना देऊन या धुमसत्या ज्वालामुखीकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना हद्दपार करायचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आता वाट न पहाता, मतांचा राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून, या संदर्भात लोकसुरक्षेसाठी सरकारचे धोरण आणि कालबद्ध कारवाई तातडीने घोषित करून इच्छाशक्ती दाखवून द्यावी.

देहली, केरळ, बंगाल या राज्यांतील जनतेप्रमाणे गोव्यातील जनतेला, विशेषतः हिंदु समाजाला हिंसक रोहिंग्या आणि बांगलादेशी जिहादी यांच्या अतिरेकाला बळी पडण्यापासून वाचवा. आग लागली की, विहीर खणण्याची वृत्ती सोडून त्वरित कारवाई करा, अशी गोव्यातील समग्र हिंदु समाजाची मागणी आहे.