
‘राजा बोले दळ हाले’, ‘नेत्याप्रमाणेच अनुयायी’, ‘जसे घर तसे वासे’, ‘बाप तसा बेटा’, ‘कुंभार तसा लोटा’, ‘घराची कळा अंगण दाखवते’, ‘गुरु तसा चेला’ या सर्व म्हणी ध्यानात (लक्षात) घेण्यासारख्या आहेत. प्रजा ही केव्हाही राजा, मंत्री, महंत, पुढारी यांचे अनुकरण करते, हे स्वाभाविक आहे. स्वतःचे आचरण समाजाला अनुकरणीय होऊन आपले विचार त्यास प्रमाणभूत होतात. हे तत्त्व न विसरता कोणत्याही तर्हेने आपल्या आचार-विचारांनी समाजाच्या उन्नतीस कोणताच अपाय होणार नाही, असा खोलवर विचार करून दीर्घदृष्टीने आणि वेदशास्त्रांच्या योग्य पर्यालोचनाने राजाने किंवा मंत्र्यांनी राज्यकारभार चालवला पाहिजे अन् तद्नुषंगाने शासनाचे नियम आखले पाहिजेत.’
धर्म म्हणजे श्रीराम आणि श्रीराम म्हणजेच धर्म !
‘धर्म म्हणजे श्रीराम ! श्रीराम म्हणजेच चालता-बोलता सगुण साकार धर्म. श्रीरामाचे आदर्श जीवन आदरणीय, आचरणीय, वंदनीय आणि पूजनीय आहे. इतकेच काय, श्रीराम धर्मरूपच आहे; म्हणूनच श्रेष्ठ धर्म आणि श्रीराम यांच्यामध्ये भिन्नभाव दिसत नाही.
ज्यांच्या आचरणातून सहज सद्गुण बाहेर पडतात, म्हणजेच अनायासे अकृत्रिम वासना असते, असा तोच सत्पुरुष ज्यांना देहवासना, लोकवासना आणि शास्त्रवासना असत नाही.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, फेब्रुवारी १९९० आणि ऑगस्ट १९९८)
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
६ जून : शिवराज्याभिषेकदिन (दिनांकानुसार)