|

नवी देहली – युनेस्कोने तमिळनाडूतील मंदिरांच्या दयनीय स्थितीविषयी यापूर्वीच चिंता व्यक्त केली आहे. जुलै २०२० मध्ये तमिळनाडू सरकारने स्वतः मद्रास उच्च न्यायालयाला सांगितले की, राज्यातील ११ सहस्र ९९९ मंदिरे अशी आहेत जेथे आर्थिक संकटामुळे एकदाही पूजा करण्यात येत नाही. ३४ सहस्र मंदिरे अशी आहेत की, तेथील वार्षिक उत्पन्न १० सहस्र रुपयांपेक्षाही अल्प आहे. याव्यतिरिक्त ३७ सहस्र मंदिरांमध्ये पूजा, देखभाल, सुरक्षा, स्वच्छता यांचे दायित्व एकाच व्यक्तीवर आहे, अशी माहिती देत सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी तमिळनाडूतील मंदिरांच्या दुःस्थितीविषयीची ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव साऊथ २०२१’मध्ये जनतेला अवगत केले.
(सौजन्य : इंडिया टुडे)
१. सद्गुरु वासुदेव म्हणाले की, राज्यातील ५ लाख एकर भूमी मंदिरांच्या नावावर आहे. २ कोटी ३३ लाख चौरस फूट जागेवर बांधकाम आहे; मात्र यांतून केवळ १२८ कोटी रुपयेच वार्षिक उत्पन्न येत आहे. यांतील १४ टक्के रक्कम लेखापरीक्षण आणि व्यवस्थापन यांवर खर्च होते, तर १-२ टक्के पूजा, सण, उत्सव यांवर खर्च होते.
२. सद्गुरु वासुदेव यांनी म्हटले की, गुरुद्वारा प्रबंधक कमिटीकडे ८५ गुरुद्वारांचे दायित्व आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न १ सहस्र कोटी रुपयांचे आहे. त्यांच्या धर्मबांधवांची ते सेवाही चांगली करतात. तमिळनाडूमध्ये हिंदूंची लोकसंख्या ८५ टक्के आहे. येथे ४४ सहस्र मंदिरे आहेत; मात्र त्यांचे वार्षिक उत्पन्न केवळ १२८ कोटी रुपये आहे.
न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतरही छत्रपती शिवाजी पथावर मासेविक्री चालूच !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !