पत्नीचे सर्व प्रकारचे दायित्व हे तिच्या पतीचेच असते. त्याने तिचे सर्व गोष्टींपासून रक्षण करणे, हे त्याचे कर्तव्यच आहे. हेही आता न्यायालयाला सांगावे लागत असेल, तर भारतातील कुटुंबव्यवस्थेमध्ये किती अनाचार चालू आहे, हे लक्षात येते !

नवी देहली – भारतात विवाहानंतर प्रचलित प्रथेनुसार, पत्नी पतीच्या घरी रहायला जाते; परंतु सासरी एखाद्या महिलेला कुटुंबियांकडून मारहाण झाली, तर तिच्या दुखापतींसाठी मुख्यत: तिचा पतीच उत्तरदायी असेल, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी केली आहे. या वेळी न्यायालयाने पत्नीला मारहाणीचा आरोप असलेल्या व्यक्तीला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. त्या व्यक्तीचा हा तिसरा विवाह होता, तर संबंधित महिलेचा हा दुसरा विवाह होता. पतीच्या अधिवक्त्यांनी पतीकडून नाही, तर सासर्यांकडून मारहाण करण्यात आली होती, असे सूत्र मांडले होते. त्यावर न्यायालयाने वरील टिप्पणी केली.
Popular Front Of India : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर आरोप निश्चित करण्याचा न्यायालयाचा आदेश
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम