पत्नीचे सर्व प्रकारचे दायित्व हे तिच्या पतीचेच असते. त्याने तिचे सर्व गोष्टींपासून रक्षण करणे, हे त्याचे कर्तव्यच आहे. हेही आता न्यायालयाला सांगावे लागत असेल, तर भारतातील कुटुंबव्यवस्थेमध्ये किती अनाचार चालू आहे, हे लक्षात येते !

नवी देहली – भारतात विवाहानंतर प्रचलित प्रथेनुसार, पत्नी पतीच्या घरी रहायला जाते; परंतु सासरी एखाद्या महिलेला कुटुंबियांकडून मारहाण झाली, तर तिच्या दुखापतींसाठी मुख्यत: तिचा पतीच उत्तरदायी असेल, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी केली आहे. या वेळी न्यायालयाने पत्नीला मारहाणीचा आरोप असलेल्या व्यक्तीला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. त्या व्यक्तीचा हा तिसरा विवाह होता, तर संबंधित महिलेचा हा दुसरा विवाह होता. पतीच्या अधिवक्त्यांनी पतीकडून नाही, तर सासर्यांकडून मारहाण करण्यात आली होती, असे सूत्र मांडले होते. त्यावर न्यायालयाने वरील टिप्पणी केली.
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवरील रासायनिक लेपनाची स्थगिती जिल्हा न्यायालयाने उठवली !
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !