बंगालमधील बॉम्बस्फोटात भाजपचे ६ कार्यकर्ते गंभीररित्या घायाळ

‘बंगाल म्हणजे बॉम्बचा कारखाना’, असेच समीकरण झाले आहे. यावर राज्य सरकार सोडाच केंद्र सरकारही काही करत नाही, हे बंगाली नागरिकांचे दुर्दैव !

कोलकाता (बंगाल) – राज्याच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रामपूर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांवर अज्ञातांनी केलेल्या बॉम्बच्या आक्रमणात ६ कार्यकर्ते गंभीररित्या घायाळ झाले आहेत. यांतील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या आक्रमणामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. दुसरीकडे ‘भाजपचे नेते वरुण प्रामाणिक यांनी हा बॉम्ब ठेवला होता’, असा दावा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.