उत्तरप्रदेशातील सीमेवर नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १ भारतीय ठार  

चीन आणि पाक यांच्याप्रमाणे नेपाळच्या कुरापतीही गेल्या काही मासांपासून चालू झाल्या आहेत, याकडे भारताने तितक्याच गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !

पीलीभीत (उत्तरप्रदेश) – येथील भारत आणि नेपाळ सीमेवर भारतीय नागरिक आणि नेपाळ पोलीस यांच्यात झालेल्या वादानंतर हाणामारी झाली. त्यात नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १ भारतीय नागरिक ठार झाला.

त्याच्या एका साथीदाराने हाणामारीमध्येच सीमा पार केल्याने त्याचा जीव वाचला, तर त्यांचा तिसरा साथीदार मात्र अद्यापही बेपत्ता आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. २६ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव गोविंदा असून तो त्याचा मित्र पप्पू सिंह आणि गुरमीत सिंह यांच्यासमवेत नेपाळमध्ये गेला होता.