
तीळगूळ घ्या गोड गोड बोला ना ।
दोन शब्द ऐकून तुम्ही घ्या ना ॥ १ ॥
जीवनात हवा शाश्वत आनंद ।
तर असावा साधनेचा छंद ॥ २ ॥
दूर करण्या काळजीचा कंद ।
धरावा दोष-निर्मूलनाचा छंद ॥ ३ ॥
पिडले तुम्हा प्रारब्धाने ।
होई ते सुसह्य नामाने ॥ ४ ॥
करा प्रयत्न श्रद्धेने ।
अनुभूती येतील त्वरेने ॥ ५ ॥
हवा गुरुकृपेचा ओघ अखंड ।
भाववृद्धीच्या प्रयत्नांत पडो ना खंड ॥ ६ ॥
मोक्षप्राप्ती हेच ध्येय या जीवनी ।
बाकी सर्व तुच्छ या अवनी ॥ ७ ॥
तीळगूळ घ्या गोड गोड बोला ना ।
दोन शब्द हे तुम्ही कृतीत आणा ना ॥ ८ ॥
परात्पर गुरुदेवांच्या चरणी अर्पण !’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१.२०२१)
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी