समाजविघातक शक्तींना शेतकरी आंदोलनात सहभागी करून घेणारे, देशद्रोही खलिस्तानवाद्यांच्या जिवावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरणारे कथित शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रभु श्रीरामचंद्रांविषयी काही बोलणे, हेच मुळात हास्यास्पद आहे !

रोहतक (हरियाणा) – श्रीराम रघुवंशी होते आणि आम्ही त्यांचेच वंशज आहोत. भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही. भाजपवाल्यांनी म. गांधी आणि रामभक्त हनुमान यांनाही ‘आंदोलनजीवी’ करून टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधानासाठी क्षमा मागितली पाहिजे, अशी मागणी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. रोहतकमधील शेतकर्यांना संबोधित करतांना राकेश टिकैत यांनी हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तरप्रदेशनंतर आता बंगालमध्ये किसान महापंचायत घेण्याची घोषणा केली आहे. शेतकरी आंदोलनाला विरोध करणार्यांना मते देऊ नका, असे आवाहन करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !