भाजप नेत्यांची महिलांविषयीची डझनभर प्रकरणे मला सांगता येतील ! – विजय वड्डेटीवार, भूकंप आणि पुनर्वसन मंत्री

अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण जनतेचा लोकशाहीवरील उरलासुरळा विश्‍वासही नष्ट करणारे आहे ! छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रासाठी हे शोभनीय नाही. अशी गलितगात्र झालेली लोकशाही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची अपरिहार्यता स्पष्ट करते !

विजय वड्डेटीवार

मुंबई – भाजपच्या नेत्यांना नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते. भाजप नेत्यांची महिलांविषयीची डझनभर प्रकरणे मला सांगता येतील, असे वक्तव्य भूकंप आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी केले. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका करण्यात येत आहे. या संदर्भात विजय वड्डेटीवार यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी विजय वड्डेटीवार म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. संजय राठोड हे ‘मिडिया ट्रायल’चे बळी ठरले आहेत.’’