
कोल्हापूर, १६ जानेवारी (वार्ता.) – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने अयोध्येला उभारण्यात येणार्या श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे. या प्रस्तावित ३ मजली मंदिरासाठी संपूर्ण भारतातून भक्तांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मकरसंक्रांतीपासून निधी समर्पण अभियान प्रारंभ झाले आहे. आहे. या अभियानाच्या अंतर्गत देशातील ११ कोटी कुटुंबांपर्यंत पोचण्याचा मानस आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी १५ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता रणजीतसिंह घाटगे, श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, ह.भ.प. भानुदास महाराज यादव आदी उपस्थित होते.
१. आर्थिक पारदर्शकता रहावी म्हणून रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने रुपये १ सहस्र, १०० रुपये आणि १० रुपयांच्या कुपन आणि पावती पुस्तके यांची रचना करून त्या माध्यमातून अधिकाधिक भक्तांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय ऑनलाईन निधी समर्पण व्यवस्थाही करण्यात आली आहे.
२. महाराष्ट्रात हे अभियान १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत होणार आहे. या अभियानामध्ये २ सहस्र संत, २ लाख रामभक्त हे सहभागी होणार आहेत.
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
UP Poster Row : मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असा फलक लावल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिर दान चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकार यांना नोटीस
विकलांग मुलांसाठीचे ‘संजय स्कूल’ यंदा विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेल्या चिकण मातीच्या ५०० श्री गणेशमूर्तींची विक्री करणार