संपूर्ण हानीचा पीक विमा मिळाला नसल्याचा निषेध
पीक विम्याची हास्यास्पद हानीभरपाई !

हिंगोली – जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे संपूर्ण पिकांची १०० टक्के हानी झाल्यानंतर पिक विमा आस्थापनांनी हेक्टरी ४० ते ४३ सहस्र रुपये हानीभरपाई देणे आवश्यक होते; मात्र पीक विमा आस्थापनांकडून केवळ १ सहस्र ८०० रुपये हानीभरपाई शेतकर्यांना देण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह अन्य शेतकर्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे १ सहस्र ८०० रुपयांचे धनादेश पाठवून निषेध केला आहे. पीक विमा आस्थापनाने नियमाप्रमाणे पीक विमा देण्याची मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे.

जिल्ह्यात या वर्षी १२४ टक्के पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, तूर, उडीद, कापूस या पिकांची मोठी हानी झाली आहे. गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता या वर्षी ३ लाख शेतकर्यांनी पीक विमा काढला होता. यामध्ये सर्वांत अधिक सोयाबीनचा पीक विमा काढला होता. त्यासाठी हेक्टरी ९०० रुपयांची रक्कम शेतकर्यांनी पीक विमा आस्थापनाकडे भरली होती, तर २०० रुपये ‘ऑनलाईन’ विमा भरण्यासाठी लागले होते.
आजपासून पावसाळ्याचे विशेष वेळापत्रक लागू !
श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथे पुलाच्या कामासाठी केले जात असलेल्या अवैध सुरुंग स्फोटांमुळे मंदिराला धोका !
आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीपात्र येथे मृत माशांचा खच
सीमावर्ती जिल्ह्यांतील लोकसंख्याशासत्रीय पालटांचा अभ्यास करा ! – Amit Shah
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात