

खानाने मंदिरे आणि मंदिरातील मूर्तींवर आघात केला ।
अहंकाराने हृदय मंदिरावर आणि गुरुस्थानावर आक्रमण केले ॥
खानाने आलिंगन दिले छत्रपती शिवरायांना ।
आम्हाला ही आलिंगन दिले या अहंकाराने ॥
खानाने दगा केला राजांच्या पाठीत खंजीरचा वार केला ।
अहंकार प्रतिदिनच दगा करतोय पाठीसह छातीत वार करतोय ॥
खानाने मंदिरे लुटली, प्रजेला लुबाडले, मुलीबाळींची अब्रू लुटली ।
अहंकाराने आमची माणसे तोडली, मन तोडली, लाज घालवली, देवापासून दूर नेले ॥
खानाने दगा केला, शिवरायांनी वाघनखांचा मारा केला ।
खंजीर खुपसून कोथळा काढला ॥
आम्ही अजून अहंकाराच्या मिठीतच आहोत ।
स्वयंसूचना सत्राच्या खंजीराला गंज लागण्याची वेळ आली ॥
दोषनिर्मूलन सारणीची वाघनखे खितपत पडून आहेत ।
हतबल झालोय आम्ही, आम्हाला शिवशक्ती द्या ॥
हे आदिशक्ती, या अहंकाराचा कोथळा काढण्याची शक्ती आम्हास दे ।
शिवछत्रपतींच्या या पराक्रमाच्या लढाऊ वृत्तीला स्मरून ॥
अहंनिर्मूलन करण्यास आम्हास शक्ती आणि भक्ती यांचे वरदान दे माते ।
अफझलखान वधाच्या निमित्ताने अहंकराचा वध करण्यासाठी बळ दे आम्हास माते, बळ दे ॥
– श्री. सुमित सागवेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !