भ्रष्टाचार्‍यांनाही फाशीची शिक्षा हवी !

फलक प्रसिद्धीकरता

कोरोनावर मात करण्याच्या कामामध्ये अनेक घोटाळे झाले आहेत. यासंदर्भात भ्रष्टाचाराच्या ४० सहस्र तक्रारी केंद्र सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये मंत्रालयांतील घोटाळे, लाचखोरी, निधीची भरपाई, तसेच सरकारी अधिकार्‍यांकडून केला गेलेला छळ, अशा तक्रारींचा समावेश आहे.