
मुंबई – उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयांच्या नियमित कामकाजाला प्रारंभ झाल्याने अधिवक्ते आणि त्यांचा कर्मचारी वर्ग यांना गर्दीच्या वेळी उपनगरी रेल्वेगाड्यांमधून प्रवासास मुभा देण्याचा विचार करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले. याविषयीची एक याचिका अधिवक्ता संघटनेने उच्च न्यायालयाकडे केली असून त्यावर न्यायालयाने सरकारला वरील सूचना केली आहे. सध्या अधिवक्त्यांना सकाळी ८ च्या अगोदर आणि ११ नंतर रेल्वे प्रवास करण्यास मुभा आहे.

दळणवळण बंदीनंतर आठ मासांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणीला प्रारंभ झाला. उच्च न्यायालयातील ही प्रत्यक्ष सुनावणी सद्य:स्थितीला प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात येत आहे. त्यातच प्रत्यक्ष सुनावणीचे आदेश घोषित होताच प्रत्यक्ष आणि दूरचित्रसंवाद यांच्या माध्यमातील सुनावणीही चालू ठेवण्याची तातडीची मागणी अधिवक्त्यांकडून केली जात आहे.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी