गोवंश हत्याबंदी कायद्याची एैशीतैशी !

ठाणे, ३ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही भिवंडी येथील नदीनाका येथे चारचाकी वाहनातून धर्मांधांनी गायींची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी गायी पळवणारी ही टोळी कह्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी गाडी सोडून पळ काढला; मात्र गायींना गाडीत कोंबून पळवणार्या टोळीच्या मागे लागलेल्या पोलिसांचे पाठलाग करतांनाचे दृश्य येथील पेट्रोल पंपावरच्या सीसीटीव्ही छायाचित्रकामध्ये कैद झाले आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अब्दुल्ला मौला शेख, गुड्डू, नदीम, जमील, तसेच गाडीचा मालक अशा ५ जणांवर विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाहनातील ३ गायींची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे, तर पसार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई