साधकांना नाममय करून आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !


श्री गुरुचरणांवर नामाचे घातले जल ।
मम हृदयी उमलले भावाचे फूल ॥ १ ॥
घातले चरणांवरी नामाचे पंचामृत ।
पंचप्राण झाले श्री गुरूंच्या अंकित ॥ २ ॥
पुनःश्च घातले नामाचे गंगाजल ।
चित्तातून नष्टिले अहंचे हालाहल ॥ ३ ॥
नामरूपी वस्त्राने पुसले चरण ।
मनरूपी पाखरू गेले आनंदून ॥ ४ ॥
चरण ठेविण्या नामाचाच चौरंग ।
मम अंतरंग हो गेले उजळून ॥ ५ ॥
चरणी वाहिले नामाचे अष्टगंध ।
मनी दरवळला भक्तीचा सुगंध ॥ ६ ॥
चरणी नामरूपी कुंकू वाहिले ।
क्षात्रतेज मम अंतरी उपजले ॥ ७ ॥
चरणी नामरूपी वाहिली हळद ।
मांगल्य निर्मिले अंतरी शुद्ध ॥ ८ ॥
नामाचा चरणी वाहिला अबीर (टीप १) ।
वैराग्याचे वाण मिळाले सुंदर ॥ ९ ॥
चरणी वाहिला नामाचा गुलाल ।
अंतरंगी आनंदतरंग उठेल ॥ १० ॥
चरणी वाहिले नामाचे कमळ ।
मम अंत:करण झाले हो निर्मळ ॥ ११ ॥
नामाचाच टिळा लाविला भाळी ।
द्वैताची जाणीवच संपून गेली ॥ १२ ॥
नामाचीच तुळशीमाळ अर्पिली ।
ज्ञानजले मम आेंजळ भरली ॥ १३ ॥
श्री गुरूंना नामाचाच दाविला नैवेद्य ।
ग्रहण करता चित्त झाले ससंवेद्य (टीप २) ॥ १४ ॥
नामाचीच उदबत्ती ओवाळली ।
देहबुद्धी चरणी समर्पिली ॥ १५ ॥
नामाचेच निरांजन ओवाळले ।
मम आत्मज्योत तेजाळली ॥ १६ ॥
नाम हेची साधन, नाम हेची साध्य ।
नामानेच केले जिवाला हो बद्ध ॥ १७ ॥
श्री गुरुचरणी नामाचेच केले नमन ।
नामातच मम विसावले जीवन ॥ १८ ॥
टीप १ – एक सुगंधी पूड
टीप २ – संवेदनशील होणे
श्री गुरुचरणी अखंड कृतज्ञ,
– सौ. अंजली अजय जोशी, सनातन आश्रम, मिरज. (१२.२.२०१६)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
बुद्धीच्या स्तरावर असलेले विज्ञान अन् बुद्धीपलीकडील अध्यात्म !
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !