‘एक अप्सरा होती. तिला उत्तम पती हवा होता. एकदा तिला ध्यानात मग्न असलेला श्री गणपति दिसला. तिने त्याला हाका मारल्या. गणपति तिला म्हणाला, ‘हे माते, माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस ?’ ती म्हणाली, ‘मला तू फार आवडला आहेस. मी तुझ्याशी विवाह करणार.’ श्री गणपति म्हणाला, ‘मी विवाह करून मोहपाशात पडणार नाही.’ त्यावर अप्सरा म्हणाली, ‘तू विवाह करशीलच, असा मी तुला शाप देते.’ श्री गणपतीने तिला प्रतिशाप दिला, ‘तू पृथ्वीवर वृक्ष होशील.’ अप्सरेला पश्चात्ताप होऊन ती म्हणाली, ‘मला क्षमा कर.’ गणपति म्हणाला, ‘माते, कृष्ण तुझ्याशी विवाह करील आणि तू सुखी होशील.’ ती अप्सरा पुढे तुळस बनली. श्री गणपतीने तुळशीला कधीच आसरा दिला नाही; म्हणून श्री गणपतीला तुळस वाहात नाहीत.’ (संदर्भ : अज्ञात)
श्री गणपतीला तुळस न वाहाण्याचे कारण
नूतन लेख
- हे श्रीसत्शक्ति माते, तुझी प्रत्येक कृती शिकण्यासाठी ।
- कोकणातील शिमगोत्सव : आस ग्रामदेवतेच्या भेटीची !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कोयत्याचा धाक दाखवणारा गुंड अटकेत !; आचार्यावर जीवघेणे आक्रमण करणार्या दोघांना अटक !…
- चिपळूण तालुक्यातील नांदगाव येथे होळी सणाच्या निमित्ताने सौ. स्वाती शिंदे यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे
- होलिका दहनाचे अध्यात्मशास्त्र आणि महत्त्व !
- अशी खेळा होळी !