
जयपूर (राजस्थान) – ‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांचे २७ मार्च या दिवशी दुपारी २ वाजता माउंट अबू येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या १०४ वर्षांच्या होत्या. दादी जानकी या गेल्या २ मासांपासून श्वसन आणि पोट यांच्या विकाराने आजारी होत्या. ‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या शांतीवन येथील मुख्य केंद्रात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादी जानकी यांचा जन्म १ जानेवारी १९१६ या दिवशी पाकिस्तानमधील हैद्राबाद येथे झाला होता. वयाच्या २१ व्या वर्षीच त्यांनी साधनेला प्रारंभ केला होता. वर्ष १९७० मध्ये त्यांनी पाश्चिमात्त्य देशांमध्ये जाऊन भारतीय तत्त्वज्ञान, राजयोग आणि मानवी मूल्ये यांचा प्रसार केला. त्यांनी जगभरातील १४० देशांमध्ये ‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या सेवाकेंद्रांची स्थापना केली. सध्या या संस्थेची जगभरात ८ सहस्र केंद्रे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजयोगिनी दादी जानकी यांच्या निधनाविषयी दुःख व्यक्त केले आहे.
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
(म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’
जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी रथ ओढण्याचा मान संस्थानने खरेदी केलेल्या बैलजोड्यांनाच !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी